Wednesday, 26 February 2014

संस्कृत 

प्राचीन काळा पासून संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जाते.आधुनिक विद्वानाच्या मते संस्कृत भाषेचे अखंड पर्व पाच सहस्त्र वर्षा पूर्वी पासून चालत आलेली भाषा आहे.भारताची ही आर्य भाषा सर्वाधिक महत्त्वशाली व्यापक आणि संपन्न स्वरूप आहे.ह्यांचा माध्यमातून भारताच्या उत्कृष्ट मनीषा प्रतिभा अमुल्य चिंतन, मनन, विवेक, रचनात्मक सर्जना आणि वैचारिक प्रज्ञा यांचे अभिव्यंजन झाले आहे. आज हे सर्व क्षेत्रांमध्ये या भाषेद्वारा ग्रंथ निर्माणची क्षीण धारा अविच्छिन रूप ने होत आहे.भारताच्या विभिन्न प्रादेशिक भाषा पंडितजन यांचा परस्पर वार्तालाप मध्ये प्रयोग करतात.हिंदू संस्कार आज पण प्रयुक्त होतात.यांचे कारण ग्रीक व लटिन  आणि प्राचीन मृत भाषेचा पेक्षा संस्कृतची स्तिथी भिन्न आहे.ही भाषा मृतभाषा नसून अमर भाषा आहे.उत्तरखंडाच्या भारतात त्याचा द्रितीय अधिकृत भाषा म्हणून संस्कृत ने राज्य केले आहे.भारताच्या २३ शासकीय राज्य भाषा पैकी एक आहे.नेपाळ मध्ये संस्कृत ला अतिशय महत्त्व दिले आहे संस्कृत ला संस्कृत ला सुरभारती, देववाणी, गिर्वाण, वाणी, देवभाषा, अमरभारती असे अनेक नावे आहे..

संस्कृत भाषेची निर्मिती



पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनीचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासून भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात. या भाषेमुळेच रुद्रर,केय्यट,मम्मट,या कश्मीरी पंडिताचे ग्रंथ  थेट रामेश्वर पर्यंत पावले. आयुर्वेदातिल चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधाचा, कश्यप कश्मिरचा अणि वृंद महाराष्ट्रचा पण संस्कृतमुळेच  हे भारत मान्य झाले. राष्ट्रभाषा कोणती असावी या करता संसदेत वाद झाला दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला अरे तूम्ही कशा करता भांडतात?संस्कृत ही तुमची राष्ट्र भाषा आहेच तीच सुरु करा संस्कृत सारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालवली मग भांडणे होणार नाही तर काय?
कोणी कीतीही नाके मुरडली तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा नव्हे तर पश्चिमात्यानी आकर्षित करत आली आहे. ह्या भाषेत केवळ ! (दंड)हे विराम चिन्ह वापरतात अन्य कोणतेही विराम चिन्ह या भाषेच्या लिपीत नाही जगातील सर्व प्राचीन ग्रंथ ऋग्वेद हा संस्कृत भाषेत आहे.
हि भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की,त्यामुळे भारतीय भाषेत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहे.

वैदिक संस्कृत

ऋषिसंहिताची भाषेला संस्कृत चे अध्यात्मक रूप म्हणटले जाते. ऋषिसंहिता प्रथम अनि दहाव्या मंडलाचि भाषा प्राचीनतर आहे काही विद्वानांना प्राचीन वैदीकभाषा चे परिवर्तित पाणिनीय (लैकिक) संस्कृत पैक्षा भिन्न मानले जाते.परंतु वैदिक भाषेत अभ्रात रुपांतर संस्कृत भाषा आद्य रुपात उपलब्ध आहे. पाणिनिने जय संस्कृत भाषेचे व्याकरण लिहले आहे ते दोन अंश आहे.

१.ज्याला अष्टव्यावी मध्ये छदप बोलले गेले आहे.
२.भाषा (जी लोकभाषा या लैकिक भाषेचे रूप मानले जाते.)

आचार्य पतंजलीचे व्याकरण महाकाव्य भाष्य हे प्रसिद्ध शब्दानुसार पहिले वैदिक भाषा आणि लैकिक भाषाचे शब्दाचा उल्लेख झाला आहे संस्कृत नवदैवी वागन्वाख्यात महर्षी वाक्यामध्ये ज्या देवभाषा संस्कृत बोलले गेले आहे.ते संभवता यास्क,पाणिनी,काव्यायन आणि पतंजलीच्या वेळे पर्येंत (वैदिक भाषा) आणि लोकभाषाचे दोन नाव सत्रांच्या दृषीटीने महत्त्वाचे आहे.

बहुतेक विद्वानाच्या मते भाषासाठी संस्कृत शब्दचा प्रयोग सर्व प्रथम वाल्मिकी रामायण चे सुंदर कांड (३० सर्ग ) चे हनुमान द्वारा विशेषण रूप मध्ये केले गेले आहे.
भारतीय परंपरे नुसार संस्कृत भाषा ही पहिली सर्वात जुनी भाषा आहे ती अर्थात प्राकृति एवम प्रत्यादि विशिष्ट विवेचन झाले नाही आहे. देवीद्वारा प्रथांना केल्यानंतर देवराज इंद्रने प्राकृति प्रत्यय इ. चे विश्लेषण विवेचनचा उपयात्मक विधान प्रस्तुत केले आहे.या संस्कार विधानाचे कारण भारत प्राचीनतम आर्य भाषेचे नाव संस्कृत पडले आहे ऋषीसंहिता कालीन ‘ साधूभाषा ‘ व   ‘ ब्राह्मण ‘  ‘आरण्यक’ आणि  ‘ देशोषनिषद ’प्रसिद्ध ग्रंथ सहित्य ‘ वैदिक भाषा ‘ च्या अंतर विकसित स्वरूप हे लैकीक संस्कृत या पाणिनीय संस्कृत बोलले गेले आहे ही भाषा ‘ संस्कृत भाषा ’ या साहित्य संस्कृत भाषेच्या नावाने ओळखली जाते.
  
भाषा ध्वनी विकासाच्या दृष्टीने ‘ संस्कृत ‘ चा अर्थ हा असा आहे की,संस (सांस् या श्वासो ) ने बनलेली (कृत ) आधात्म व सम्प्रक विकास ने आलेली आहे काही लोक संस्कृतचा एक भाग मानतात देशकाळाच्या  दृष्टीने संस्कृतचे सर्व स्वरूपच मूलाधार पूर्व काळ मध्ये उच्च,मध्य देशीय आणि आर्य वर्तीय विभाषा आहे पाणिनी सूत्रान मध्ये विभाषा या उदीमाच् शब्दांनी या भाषेचे उल्लेख केला आहे यांच्या व्यतिरिक्त काही क्षेत्रांमध्ये  ‘प्राच्य ‘इ. भाषा बोलल्या जातात पाणिनी हे नियमित व्याकरण द्वारा भाषा ला एक परिष्कृत आणि सर्वमय प्रयोग मध्ये योग्य रूप दिले आहे पंतजली च्या वेळेस अर्य्वार्त चे वैशिष्ट्य लोकांमध्ये संस्कृत प्रायः हि नेहमीच बोला बोलीची भाषा आहे.म्हणून भाषाताज्ञाच्या मते हि सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती व ते संस्कृत मध्ये संभाषण करत असत असे लोक म्हणतात.

सरस्वती लिपी



संस्कृत ची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली.आणि आता संस्कृत देवनागरी लिपीत लिहिली जाते आहे.भारताच्या राज्यांमध्ये बोलल्या जाणा-या भाषेचे लिपीतच त्या राज्यात संस्कृत लिहिली जाते .पूर्वी हस्त लिखित अनेक लिप्यांत लिहिले जाते असे परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथाचे मुद्रण सर्वसामान्य पाने देवनागरी लिपीत होते.


आताच्या काळात संस्कृत भाषेला अत्यंत महत्व आहे.आज च्या तरुणाईला संस्कृत भाषेचा अभ्यास करने गरजेचे वातु लागले आहे.कारन सगळ्या भाषेचे मूळ संस्कृत आहे. म्हणून ही भाषा सगळे आवडीने शिकतात. संस्कृत भाषेची साहित्य सरस आहे.तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे.  

Wednesday, 19 February 2014

बंगाली


ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बंग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे.संस्कृत ,पाली व प्राकृत या भाषेमंधून बंगाली भाषेचे जन्म झाला आहे बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून या प्रदेशात सध्याच्या बांग्लादेशात ब भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होती बंगाली भाषिकांची एकूण संस्ख्या २३ कोटींच्या आसपास असून जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते (भाषा संख्ये नुसार जगभरात पाचवी )बंगाली बंगालदेशातील प्रमुख भाषा असून आहे.भाषिक संख्येतून दुस-या क्रमाकांची भाषा आहे.बंगाली व आसामी भाषा इंडो इराणी भाषा कुळातील भागोलिक दृष्ट्या पूर्वे कडील भाषा आहे.

बंगाली भाषेचे विकास तीन टप्पे आहे.

      जिनी बंगाली
२    मध्य बंगाली
३    आधुनिक बंगाली

राष्ट्र भाषा व बांग्लादेश प्रज्जासात्तक अधिकृत भाषा आहे.ऐतहासिक दृष्ट्या लिखित भाषेच्या २ शैली आहे.

साधू भाषा

बंगलातील साधुभाषा म्हणजे शुद्ध वा उच्च कोटीचा भाषा भारताचे राष्ट्र गीत वंदे मातरम बंकिमचन्द्र च ट्टू पाध्याय) या दोन्हीही या दोन्हीही रचना साधू भाषेत आहेत.
चलति अथवा चाळीत भाषा हि जुनी लिखित बंगाली आहे.

बंगाली लिपी व पूर्व नागरी लिपी



चटर्जि बंगालीच्या बोलीचे रठ, बंग, कामरूप व वरेन्द्र अशा ४ गटात विभाजन करतात बोलींचे बदलतील सातत्य बंगालीचे आणखी एक वैशिट्य मराठी प्रमाणेच भैगोलिक अंतरासोबत बंगाली हळू हळू बदलत जाते ठळकपणे दाखवता येईल असा बोली भेद पश्चिम व पूर्व बंगाल मधील भाषा भेद ,पूर्व बंगाल (आजचा बंगाल) मुस्लीम बद्दल असून पश्चिम बंगाल हा हिंदू बहुल आहे.
त्यामुळे ह्या धार्मिक फरकाचे प्रतिबिंब या प्रदेशातल्या बोलींवर जाणवते.पश्चिम बंगाल त्रीफर या राज्याची राज्यभाषा असं राज्यात सह राज्य भाषेचा दर्जा बांग्लादेशात राज्यभाषा व बांगलादेश प्रजासत्ताकची अधिकृत भाषा आहे.भारताच्या अन्य देशांसारख्या ह्याही देशांच्या भाषेला १,००० वर्ष जवळ पास झाले आहे.

बंगाली लिपी 

पूर्वी नागरीलिपी ती  एक परीमार्जीत रूप आहे.हिला असमिया ब विष्णुप्रिया मणिपूर ह्या भाषेमध्ये लिहण्याकरता प्रयोग केले जातात पूर्वीनागरी लिपीचा संबंध हा ब्रह्मी लिपीच्या बरोबर देवनागरी व भारतच्या अन्य लेखनाच्या प्रणाली आहे.आधुनिक बांग्ला लिपीला चाल्स १७७८ मध्ये आधार दिला गेला आहे. विलिंक्सद्वारा १७७८ मध्ये आधार दिला गेला आहे कारण ठेव्हा त्यांनी टाइप सेटचा प्रयोग केला होता पूर्वी नागरी हि ब्राह्मी लिपी चे रूप आहे.           

Thursday, 13 February 2014

राष्ट्रभाषा हिंदी 


हिंदी
हिंदी हि भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद आर्य भाषा समूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे.
आजच्या घडीला भारताच्या दिल्ली उत्तरप्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंद भाषिक आहेत. इंग्रजी बरोबरच हिंदी ही भारतसरकारच्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला राष्ट्रभाषा ' म्हणून संबोधले जावे. जगातील सुमारे ५०कोटी लोक हिंदी समजू किवा बोलू शकतात. चीनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी हि जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर वापरल्या जाणा-या पहिल्या दहात हिंदी आहे.
भारतीय घटनेतील कलम ३५१ नुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाच्या अंगीकाकरून हिंदी भाषेचा विकास करण्याचा आदेश घटनेत दिला आहे.
जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रातील वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालय या नावाने स्थापन केले आहे. हिंदी या शब्दाचा संबंध संस्कृत शब्द सिंधू या शब्दाशी आहे. हा सिंधू शब्द इराण मध्ये जाऊन हिन्दू, हिंदी आणि नंतर हिन्द असा करण्यात आला हिंदी हा शब्द अरबी कडून ग्रीक मध्ये ‘इन्दीके’, इन्दिका ‘,लटिन मध्ये ‘इन्दिया’ आणि इंग्रजी मध्ये इंडिया बनला. भारताच्या गैर मुस्लीम लोकांच्या क्षेत्रामध्ये बोलली जाणारी भाषेला ‘भाखा' या नावाने ओळखली जाते. हिंदी शब्दावली चे मुख्यतः दोन प्रकार आहे.
१.तत्सम 
२.तद्धव
हिंदी व उर्दू
हिंदी व उर्दू ला एकच भाषा समजली जाते हिंदी ही देवनागरी लिपी मध्ये लिहिली जाते.हिंदी  चे शब्द हे संस्कृत वर आधारित आहे. तर उर्दू ही फारसी मध्ये लिहिली आहे. ह्या लिपीचा प्रभाव हा फारसी आणि अरबी भाषेवर प्रभाव जास्त दिसून येतो आहे. हिंदी हे हिंदी – युरोपियन – भाषेच्या संस्थेमध्ये येते. हिंदी – इराणी शाखांची हिंदी ही आर्य उपशाखाच्या अंतर्गत वर्गीकृत करण्यात आले आहे. हिंदीची संस्कृत पासून उत्पती झाली आहे. उर्दू , काश्मिरी बंगाली, उडिया ,पंजाबी रोमानी,मराठी, नेपाली या सर्व भाषां मध्ये हिंदी ही आर्य भाषा आहे.
हिंदीच्या चार प्रमुख शैली आहे.
१.उच्च हिंदी
२.दक्खीनी  
३.रेख्ता  
४.उर्दू

उच्च हिंदी 
उच्च हिंदी ही मानसीकृत रूप आहे त्याची लिपी देवनागरी आहे. ह्या भाषेत संस्कृतचे खूप शब्द आहे. या भाषेला शुध्द हिंदी म्हंटली जाते. उच्च हिंदी ही खडीबोली त्यावर आधारित आहे.

दक्खीनी  
हे हिंदीचे रूप आहे ही भाषा हैदराबाद आणि त्याच्या जवळपास बोलली जाते.
रेख्ता
रेख्ता हि शैली उर्दूचे रूप शायरी वर आधारित आहे.
उर्दू
    
उर्दू हे हिंदीच्या देवनागरी लिपीचे रूप आहे. ही  भाषा फारसी अरबी मध्ये लिपी मध्ये लिहिली गेली आहे.ही भाषा खडीबोली व आधारित आहे.
हिंदी आणि उर्दूला हिंदूस्थानी भाषा म्हंटली जाते. हिंदुस्थानची हिंदी ही मानिकृत भाषा आहे. उच्च हिंदी ही भारतीय संघाची राजभाषा आहे.उत्तरप्रदेश,बिहार,झारखंड, मध्यप्रदेश,उत्तरांचल,हिमाचलप्रदेश, छातीसगड, राजस्थान,हरियाना,दिल्ली,ह्यामध्ये हिंदी बोलण्यारांची संख्या सगळ्यात जास्त आहे, उर्दू ही  पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर मध्ये बोलली जाते.  


            

पंजाबची बोली

पंजाबी
पंजाबी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख भाषा आहे. जगभर सुमारे १३ कोटी भाषिक असणारी पंजाबी जगातील असणारी नवव्या कमांकाची सवाधिक वापरली जाणारी भाषा आहे.पंजाबी लोकांची ती मातृभाषा आहे.

पाकिस्तान मध्ये पंजाबी पहिल्या क्रमांकाची तर भांरतामध्ये अकराव्या क्रमांकाची भाषा आहे. कॅनडा व युनाटेड किंग्डमध्ये भाषिकांची संख्या तिस-या क्रमांकावर आहे. अमृतसर, जालंधर, चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू, दिल्ली, हया प्रमुख राज्यान मध्ये पंजाबी भाषा बोलली जाते .
भारतातच्या संविधानातील आठव्या अनुसुची नुसार पंजाबी ही भारताच्या अधिकृत भाषापैकी एक आहे. भारताच्या सिनेउघोगा मध्ये पंजाबीला विशेष स्थान असून बॉलिवूड चित्रपटां मधील ५० टक्यांहून अधिक लोकप्रिय गाणी पंजाबी भाषेमधील आहे.

बाराव्या शतकां मध्ये एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयास आलेली पंजाबी पंधराव्या शतकांमध्ये स्थापन झालेल्या शीख धर्मामधील मुख्य भाषा बनली. गुरू ग्रंथ साहिब शीखांचा पविञ ग्रंथ प्रामुख्याने गुरू मुखी लिपी वापरून पंजाबी मध्येच लिहिला गेला आहे. गुरू नानकांच्या आयुष्यावर लिहिला गेलेला जनमानसा साठी कथा संग्रह सर्वात जुन्या वाङ्मय पैकी मानला जातो. शाह हुसेन, सुलतान शाह, शरफ बुलेशाह इ. मध्य युगीन सुफी पंजाबी कवी होऊन गेले.

पश्चिम पंजाबी ही पंजाबी उपभाषा आहे. पंजाबमध्ये पहाडी, दुबाआ, पुआधी, मलवई राठी हया भाषा बोलल्या जातात. पंजाबी हे नाव आत्ता पडले आहे. प्राचीनकाळी पंजाबला सप्तसिंधू व पंचनव हे नाव होते. त्यानंतर पंजाब हे नाव ठेवण्यात आले होते. पंजाबी हया भाषेमध्ये इंगजी व फारसी हया शब्दांचा वापर केला आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्ति नंतर हिंदीची राष्ट्र भाषा झाल्यामुळे त्यामध्ये संस्कृत, हिंदी चे शब्द जास्त प्रमाणात आढळून येतील.
                                                                                                 
                                                                                              

 गुरुमुखी लिपी   गुरुमुखी ही पंजाबी भाषा लिहण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे हि लिपि ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपित विकसित झाली. हया लिपीचे प्रामाणीकरण शीखांचे दुसरे गुरु अंगददेथ यांनी १६व्या शतकात केले.गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा पविञ गंध गुरुमुखी वापरुन लिहला गेला आहे.





गुरूमुख लिपीचा अर्थ
गुरूमुखचा अर्थ म्हणजे गुरुंच्या मुखांतुन निघालेली वाणी तिला पंजाब मध्ये गुरुमुख लिपि म्हटले जाते. हया लिपीचे तीन स्वर आणि ३२व्यजने आहेत.
मेवाडी राजस्थान

राजस्थान



राजस्थानात जी भाषा सर्वत्र बोलली जाते. ती म्हणजे राजस्थानी होय. अनेक बोलींच्या समन्वयाने बनलेली ती एक स्वतंत्र्य भाषा आहे. ती आर्य भाषेची एक शाखा आहे. भारतात आर्य प्रथम पदार्पण करते झाले ते पंजाबप्रदेशात आर्य लोक संस्कृत भाषा बोलत आणि त्याच भाषेत आपली सवय धर्मकृत्ये आणि यज्ञयाग संपादित करत त्याच काळात भारतात अन्य लोक जी भाषा बोलत तिला त्यामूळेच प्राकृत भाषा म्हटले जात होते. संस्कृतच्या उलट प्राकृत ही भाषा सामान्य लोकांची बोलीभाषा आहे.

काळा नुसार प्राकृत भाषेचेही दोन प्रमुख भेद आहे. पाली आणि अर्थ मागधी अशी त्यांना नावे मिळाली। वैदिक धर्मियांनी रामायण, महाभारत ग्रंथांची रचना करुन तसेच कथा काव्ये प्रबंध नाटके लिहून संस्कत भाषेला ज्ञानभाषा बनविले। बौद्ध विशेषतः हीनयानी बौद्ध आपली धर्म भाषा म्हणून पाली भाषा स्वीकारली. त्यांनी आपले धर्म ग्रंथ आणि धर्मपोषक कथा आख्याने इ. साहित्य पाली भाषेत निर्मून तिला गौरविण्यात आले.

अपभ्रंशाच्या अनेक भेदात नागर अपभ्रंश नावाचा भेद होता. गुजरात व पश्चिम राजस्थान हे या नागर अपभ्रंशाच्या क्षेत्र होते. त्याला कन्हैय्या लाल मुनशी त्याला गुर्जरी अपभ्रंश म्हणतात. कारण प्राचीनकाळी गुर्जर नामक देशात आधुनिक गुजरात आणि राजस्थान या दोघाचाही काही भाग संमिलीत होता. या गुर्जर अपभ्रंशापासून पुढे राजस्थानी भाषा उगम पावली तिलाच पुढे ' डिंगल ' भाषा असे नाव पडले.

राजस्थानी भाषेचा कालनिर्णय करणे कठीण आहे. अनुमान असे आहे की ११ व्या शतकांच्या पूर्वाधात तिचा जन्म झाला असावा. याच काळात ती अपभ्रंश पासून पृथक झ़ाली. आणि असे स्वतः च्या नवा ठसा उमटवला. राजस्थानी भाषेच्या अनेक बोली भाषा आहे. राजस्थान मध्ये मेवाडी, मारवाडी, ढुंढाडी, मालवी या मुखतः भाषा बोलल्या जातात.


मेवाडी
दक्षिण भागात मेवाड मध्ये बोलली जाणारी भाषा आहे . ही भाषा दिल्लीच्या दक्षिणेस भरतपूर हया भागात जास्त प्रचलित आहे. चरणदास यांनी मेवाडी बोली भाषेला साहित्यिक स्वरुप देऊन कृतार्थ केले ते यानीच.

मारवाडी
मारवाडी हा समाज राजस्थानमध्ये आहे. जोधपुर, बिकोनेर, जेसलेमट, मेवाड, किशनगट अशा ब-याच मोठया प्रदेशात या बोलीचा प्रसार आहे. हया भाषेला प्राचीनकाळी मरू भाषा म्हणतात. आठव्या शतकांतल्या अठरा प्रमुख देशभाषान ची गणनांमध्ये मरू भाषेचेही नाव आहे. मारवाडीचा वाङमयींन बगीचा फुलवण्यापुवी राजस्थानात राजदरबारी संस्कृतला प्राधान्य होते. राजस्थान आता स्वातंत्र असल्यामुळे तिथे राजस्थानी भाषेचे अस्तिव आहे.

मालवी
संपूर्ण माळवा व मेवाडा या भागात ही भाषा प्रचलित आहे. हया भाषेला थोडाफार मराठीचा स्पर्श आहे ही बोली कोमल व श्रवणरम्य प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे मीराबाई भाव-जीवनाच्या कथा आणि व्यथा याच बोलीच्या व्दारे हया भाषेची कोमलता उलगडून आली आहे.

राजस्थान मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. परंतु हया काही विशेष भाषेचे महत्त्व जास्त आहे व त्या प्रत्येक भाषेच्या काहीतरी वैशिष्ट्य आहे. हया भाषेला सरकारची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे.

Saturday, 8 February 2014

केरळी मणिप्रवाळम् 


मल्याळम

केरळची भाषा  बोलली जाणारी हि भाषा मल्याळम हा शब्द ' मलय ' म्हणजे ' पर्वत ' आणि    ' आलम ' म्हणजे समुद्र अशा दोन शब्दापासून बनेलेल आहे. हि भाषा अरबी समुद्र  हि बोलली जाते. हि भाषा द्राविडी भाषेतील चौथा क्रमांकाची मुख्य भाषा  आहे.  भारतीय प्रजासत्ताक दिना  दिवशी २२ अधिकृत भाषापैकी हि एक भाषा असून ती केरळ ,लक्षद्वीप , पॉंडेचरी या केंद्रशासित  प्रदेशामध्ये राज्यभाषा आहे. मल्याळम भाषेच्या उत्तपिबद्दल भाषा विद्वान मध्ये मतभेद आहेत. काहींचे मत हि भाषा संस्कृत मधून उत्त्पन झाली. कोवुन्नि नेदुगदि या विद्वानाने आपल्या " केरळ कौमुदी " नावाच्या व्याकरण ग्रंथात असे म्हंटले आहे कि, मल्याळम भाषेची गंगा संस्कृतच्या हिमालयात  उगम पावून ती द्राविडी भाषेच्या कारकिर्दीत मिळालेली आहे.
    
काही विद्वानांच्या मते प्राकृत पासून मल्याळम जन्म झाला आहे. परंतु  डॉक्टर कोल्डवेल यांनी लिहलेल्या द्रविड भाषांचे तुलनात्मक व्याकरण या ग्रंथात मल्याळम हि तमिळ भाषेपासून उत्त्पन्न झाले आहे असे म्हंटले आहे. या मतांशी अनेक भाषा शास्त्री सहमत असून मल्याळम द्रविड भाषा पैकी एक असे मानले जाते. २०१३ मध्ये भारत सरकारद्वारे एक शास्त्रीय भाषा म्हणुन  घोषित करण्यात आले आहे. २००१ च्या जनगणनुसार  हे माहित पडले कि, हि भाषा मल्याळम,केरळ,तमिळनाडू,  कन्याकुमारी, कोथमदुर, कर्नाटक दक्षिणकन्नड  या राज्यात ३३ लाख लोकांद्वारे बोलली जाते.

मलयाळम्  भाषेवर तामिळ  भाषेचा बराच मोठा प्रभाव दिसतो. प्राचीन तमिळ लेखक हे केरळचेच रहिवासी होते. त्यामुळे 'शिलप्पधिकारम् या प्राचीन महाकाव्याचा लेखक केरळीच होता. पुढे आर्यांच्या प्रभावामुळे  या भाषांवर  संस्कृतीची छाया  पडली. अनेक संस्कृत पंडित केरळ भूमीत निर्माण झाले.आद्य शंकराचार्य यांनी आपली सर्व ग्रंथ रचना संस्कृतात लिहिलेही परंपरा इसवी सनाच्या तिस-या शतकापासून सुरु झ़ाली ती पुढे पुष्कळच वाढली भाषेची अजून एक साहित्य शैली प्रसिद्ध आहे ती म्हणजे ' मणिप्रवालम् '

मणिप्रवालम्  शैली


केरळच्या मातृ भाषेवर संस्कृतचा प्रभाव फारच गडद पडला आहे.त्यामुळे एक  विचित्र  निराळीच साहित्यिक - शैली जन्मास आली.तिला 
'मणिप्रवालम्' असे म्हणतात
 'मणिप्रवालम्' हा शब्द दक्षिण भारतातील  इतर भाषांच्या  मधूनही आढळतो. यात संस्कृत आणि द्रविड शब्दाचे समिश्रण असते. .परंतु   मलयाळम् मध्ये  मात्र त्यांचे वेगळे रूप आहे.'लिलातिळकम् ' या ग्रंथात असे म्हटले आहे कि,
'मणि प्रवाळम्' भाषेची एक शैली आहे कि, जिच्यात मलयाळम् चे  मणि आणि संस्कृतची पोवळी-प्रवाळ हि गुंफलेली असतात ' मलयाळम् भाषेने केवळ संस्कृत मधील शब्दच स्वीकारले असे नाही तर त्या शब्दांचे स्वरूप अणि विभक्त - भेद देखील संस्कृत प्रमाणे आत्मसात केले आहेत.

मणिप्रवालम्  शैलीतील साहित्यिक रचना देखील केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.ही रचना ' संदेश - काव्य ' अणि ' चम्पू - काव्य ' अशा  स्वरुपात आढळते.        

Thursday, 6 February 2014

तामिळनाडु ची तामिळ 

तामिळ भाषा

तामिळ भाषा ही तामिळनाडू मध्ये बोलली जाते. जसे मराठी भाषेचे अनेक उपप्रकार पडतांना दिसून येतात. त्याच प्रमाणे तामिळ ह्या भाषेचे ही अनेक उपप्रकार पडतात. तामिळ भाषा ही द्राविडी भाषा परिवारातील सर्वात अधिक विकसित आणि समृद्ध भाषा आहे. ही जगातील प्राचीन मुलभूत भाषापैकी एक भाषा आहे. इ.स. पूर्व कित्येक शतकापासून या भाषेचे सुसंस्कृत आणि सुव्यवस्था असे रूप आढळते. प्रचलित भारतीय भाषांत तामिळ ही एकच अशी भाषा आहे कि जी संस्कृतच्या साह्य्यावाचून सर्व प्रकारच्या विचारांची समर्थअभिव्यक्ती करू शकते. गेल्या काही शतकापासून तामिळ भाषेवर संस्कृतचा प्रभाव पडलेला असला तरी अन्य द्राविडी भाष्यांच्या तुलनेत तो अत्यल्प आहे. थोड्या शब्दात जोरकस ऑर्थ व्यक्त करण्याच्या बाबतीत तामिळ भाषेत हात धरणारी दुसरी भाषा क्वचित असेल असे मत पसिव्हलने व्यक्त केले आहे.

तामिळ भाषा ही मद्रास पासून ते कन्याकुमारी पर्येंत पसरलेला आहे. या शिवाय सिलोनच्या उत्तर भागातही या भाषिकांची संख्या खूप मोठी असल्याचे दिसून येत आहे.  तसेच ओडीसा, ब्रह्मदेश, मॉरीशियस बेटे अन्य ब्रिटीश वसाहती यांमध्ये तामिळ भाषिक लहान मोठ्या संख्येयेने विखुरलेली आहेत. सध्या तामिळ  भाषिकांची संख्या सुमारे तीन कोटी असून त्यापैकी सुमारे सव्वा कोटी लोक सिलोन मध्ये राहत आहेत.

झरुल,कसुव ,कोरव, कैकाडी आणि बरमंडी या तामिळच्या पाच बोलीभाषा आहेत. काही अल्प संख्यांक जमाती निलगिरी विभागात आहेत. आणि उरलेल्या तीन बोलीभाषा काही भटक्या जाती जमातीत प्रचलित आहेत. शेनु (पूर्ण अथवा साधू ) व कोंडून (ग्रामीण अथवा असाधू) अशी तामिळ प्रमाण भाषेची दोन रूपे आहे. यांतील पहिले रूप साहित्याचे माध्यम असून दुस-या लोकांच्या नित्याची भाषा म्हणून वापरत आहे. तामिळनाडू मध्ये तमिळ लिपीचे महत्व हि खूप आहे.

तामिळ लिपी



भाषेप्रमाणे तामिळ लिपीला हि तितकेच महत्व दिले जाते. तामिळ लिपी ही प्राचीन ब्राह्मी लिपीच्या एका विशिष्ट दाक्षिणात्य शैलीतील आहेत. तामिळ भाषेला स्वःताची अशी वैशिटय तमिळ लिपीला आहे. 






तामिळ लिपीचे दोन प्रकार पडतात 

१. कोळएकुत्त 

२. वट्टेकुत्त
       
कोळ म्हणजे काठी ज्या लिपीतील रेषा काठीसारख्या सरळ असतात. ती कोळ एकुत्त लिपी होय. दुसरी वट्टेकुत्त लिपी गोलाकार वळणाची आहे.

वट्टेम्हणजे गोलाकार ही एक प्रकारची मोडी लिपी आहे.
तामिळ भाषा ही तमिळनाडू व पदुच्चेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राज्यभाषा आहे. तसेच भारतातील पहिला अभिजात भाषेचा मान तामिळ भाषेला देण्यात आला आहे. ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. तामिळ भाषेला २००४ मध्ये भारत सरकारद्वारे शास्त्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झ़ाला आहे.